ई पीक पाहणी बाबत शासनाचा मोठा निर्णय; रब्बी ई पीक पाहणीला मुदतवाढ.
E Peek Pahani GR
राज्यात रब्बी हंगाम २०२५-२६ अंतर्गत दि.१० डिसेंबर २०२५ पासून ते २४ जानेवारी २०२६ या कालावधीत शेतकरी स्तरावर सुरु झाला होता.
यानंतर सहायक स्तरावरून शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी नोंदणी करण्यात आली होती.
राज्यात बऱ्याच जिल्ह्यात उद्भवलेली नैसर्गिक आपत्ती, पीक विमा, पीक कर्ज इ. लाभापासून कोणताही शेतकरी वंचित राहू नये याकरीता सहायक स्तरावरून करावयाच्या पीक नोंदणीला (DCS) दि.३१ मार्च २०२६ अखरेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
सन २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा सभागृहात झालेल्या चर्चेवेळी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विहित मुदतीत ई-पीक पाहणी नोंद न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची नोंद घेण्यासाठी ई पीक पाहणीला मुदतवाढ देण्याचे निवेदन दिले.
राज्यात आतापर्यंत फक्त ५५.६९% ई पीक पाहणी झाली आहे. रब्बी हंगामातील ई पीक पाहणी नोंदणी १००% पूर्ण करण्याचे केंद्र शासनाचे निर्देश आहेत यानुसार सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्याचे मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.