जमिनीचे वाद आता कोर्टाबाहेरच मिटणार; राज्यात विशेष अभियान | Mahatma Jyotirao Phule Mahsul Lok Adalat 2026
जमिनीचे वाद आता कोर्टाबाहेरच मिटणार; राज्यात विशेष अभियान महसुली दावे, वाद मिटविण्यासाठी राज्य सरकारचा महसुल लोक अदालत घेण्याचा निर्णय Mahatma Jyotirao Phule Mahsul Lok Adalat 2026 राज्यात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये वर्षानुवर्ष जमिनीचे वाद महसुली दावे ही सुरू असतात आणि ती प्रकरण वर्षानुवर्ष प्रलंबित राहतात. या प्रकरणावरती शेतकऱ्यांना अमाप पैसा आणि वेळ खर्च करावा लागतो. ग्रामीण भागामध्ये प्रलंबित असलेले जमिनीचे वाद आणि महसुली दावे हे कायमस्वरूपी सोडवण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून महसूल व वन विभागाने 14 ऑगस्ट 2026 रोजी एक महत्त्वाचा जीआर निर्गमित करून राज्यात महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक आदालत अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात एक सप्टेंबर 2026 ते 31 मार्च 2017 20 या सात महिन्याच्या कालावधीमध्ये हे अभियान राबवले जाणार आहे. राज्यातील मंडळ अधिकारी नायब तहसीलदार तहसीलदार उपविभागीय अधिकारी भूसंपादन उपजिल्हाधिकारी अप्पर जिल्हाधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या अधिकारातील प्रलंबित असलेले दावे या आदालतीच्या माध्यमातून निकाली काढले जाणार आहेत. ...