Recent Post

Popular Posts

अखेर शक्तिपीठ महामार्गात नवीन बदल; GR आला | Shaktipeeth Mahamarg New Update

अखेर शक्तिपीठ महामार्गात नवीन बदल; GR आला

Shaktipeeth Mahamarg New Update

अखेर मोठ्या विरोधानंतर शक्तीपीठ महामार्गात बदल करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. १ एप्रिल २०२६ रोजी यासंदर्भातील GR निर्गमित करून या महामार्गाचे नवीन आखणीला मंजुरी देण्यात आली आहे.

राज्यात शक्तीपीठ महामार्गासाठी दि.०७.०२.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये नागपूर गोवा शिघ्रसंचार द्रुतगती महामार्ग (महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग) पवनार, जि. वर्धा ते पत्रादेवी, जि. सिंधुदुर्ग या ८०२.५९२ कि.मी लांबीच्या आखणीस मान्यता देण्यात आलेली होती.

या आखणीनुसार महामार्गासाठी महाराष्ट्र महामार्ग अधिनियम १९५५ नुसार भूसंपादन करण्याच्या अनुषंगाने प्रसिध्द केलेली प्रारंभिक अधिसूचना कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, करवीर, हातकणंगले, कागल, भूदरगड, आजरा तालुक्यातील मंजूर आखणीसाठी दि.१५.१०.२०२४ रोजीच्या अधिसूचनेन्वये रद्द करण्यात आलेली आहे. 

यानंतर दि.२८.०८.२०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये पवनार ते सांगली दरम्यानची आखणी कायम ठेवण्यास मान्यता देऊन उर्वरित आखणीचे उपलब्ध सर्व पर्याय व संभाव्य पर्याय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने तपासून शासनास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

सर्वे नंबर यादी PDF 

संबंधित मा. मंत्री व मा. लोकप्रतिनिधी यांचेशी चर्चा करून व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मार्गदर्शक तत्वांना (इंडियन रोड काँग्रेस विशेष पब्लिकेशन क्र.१९:२०२० च्या मूल्यांकन मॅट्रीक्स) अनुसरुन प्रत्यक्ष स्थळ पाहणीनुसार विविध पर्यायी आखणींचा अभ्यास करुन तुलनात्मक दृष्टया सर्वाधिक सुयोग्य अशी सुधारीत आखणी अंतिम करुन प्रस्तावित करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग वर्धा, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातुर, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापुर, सिंधुदुर्ग या १३ जिल्ह्यांतून, ४० तालुक्यांमधून जात असून सदर महामार्गामुळे महाराष्ट्रातील प्रमुख शक्तीपीठे माहूर, तूळजापूर, कोल्हापूर यांचेसह २१ धार्मिक स्थळे जोडली जाणार आहेत. सदर महामार्गामुळे नागपूर ते गोवा हा सद्यःस्थितीतील १८ तासांचा प्रवास साधारणतः ८ तासावर येणे अपेक्षित आहे.

या आखणीनुसार वर्धा, यवतमाळ, बीड व लातुर या जिल्ह्यांमधील आखणी कायम ठेवण्यात येणार आहे तर नांदेड, हिंगोली, परभणी, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापुर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील मूळ मंजूर आखणीमध्ये सुधारणा करुन व सातारा जिल्ह्यामधील आखणी नव्याने करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे.

या महामार्गाच्या अर्थात महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग दिग्रज, ता.जि. वर्धा ते बांदा, ता. सांवतवाडी, जि. सिंधुदुर्ग पर्यंत (साखळी क्र. कि.मी. ०.००० ते कि.मी. ८५६.७६५) सुधारीत आखणीस मान्यता देण्यात आली आहे.

शासन निर्णय येथे पहा 👇🏻 👇🏻 

नागपूर-गोवा (पवनार ते पत्रादेवी) प्रवेश नियंत्रित शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गाच्या (महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग) सुधारित आखणीस मान्यता





जलतारा - शेतकऱ्यांना मिळणार 4642 रुपयांच अनुदान || Jaltara yojana

 जलतारा - शेतकऱ्यांना मिळणार ४६४२ रुपयांच अनुदान

Jaltara yojana

Jaltara yojana

मनरेगा अंतर्गत भूजल पातळी वाढीसाठी ‘जलतारा’ प्रत्येक एक एकर शेतजमिनीत एक जलतारा (शोषखड्डा) निर्माण होणार

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) जलतारा प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करून राज्यातील भूजल पातळी वाढविण्यासाठी जलतारा निर्माण करून एक आदर्श मॉडेल तयार.

जलतारा ‘हे अकुशल स्वरूपाचे काम असल्याने शेतकरी स्वतः जॉबकार्ड काढून काम करू शकतात.

प्रत्येक गावात किमान ५० शेतकरी सहभागी करून ही योजना राबविली जात आहे.

'प्रत्येक शेताला पाणी' संकल्पनेवर आधारित जलतारा योजना राबविली जात आहे.

केंद्र शासनाच्या ‘प्रत्येक शेताला पाणी’ तसेच ‘जेव्हा आणि जिथे पाऊस पडेल तिथे पाणी आडवा’ या संकल्पनेवर आधारित हा प्रकल्प असून, प्रत्येक एक एकर शेतासाठी ४x४x६ फूट आकाराचा शोषखड्डा (जलतारा) खोदण्यात येणार आहे. पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरवणे, हा उद्देश आहे.

या खड्ड्यांत मोठ्या दगडांचा वापर करून पाण्याचा निचरा सुलभ केला जाणार आहे. यामुळे शेतजमिनीत ओलावा अधिक काळ टिकेल, अतिरिक्त पावसाचे पाणी शेतात साचणार नाही.

परिणामी, पिकांची उत्पादकता वाढेल आणि जमिन चिबड होण्यापासून वाचेल.

मनरेगामार्फत निधी व अंमलबजावणीची रूपरेषा

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील प्रौढ व्यक्तींना अकुशल कामाची संधी उपलब्ध करून देणे हा आहे.

या योजनेतून जलतारा प्रकल्पासाठी डोंगराळ भागात ५,२६३ रुपये व इतर भागात ४,६४२ रुपये प्रति काम मंजूर आहेत. यातील ९० टक्के कामे अकुशल स्वरूपाची आहेत.

ग्रामसभा, मंजुरी व कामाचा कालबद्ध कार्यक्रम

येत्या १ मे रोजीच्या ग्रामसभेत जलतारा प्रकल्पाचा विषय मांडून कामांना मंजुरी दिली जाणार आहे. त्यानंतर लाभार्थींची निवड करून, ५ मेपर्यंत प्रस्ताव तयार केला जाईल आणि १० मेपर्यंत कामांचे आदेश दिले जातील. पुढील दहा दिवसांत, म्हणजेच २० मेपर्यंत संपूर्ण जलतारा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

कामांची गुणवत्ता व प्रगती तपासण्यासाठी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गावपातळीवर भेटी देणार आहेत.

मजुरीपोटी मिळणार 4642 रुपये!

जलतारा योजनेंतर्गत पाच चौरस फूट आकाराचा आणि सहा फूट खोल खड्डा खोदल्यानंतर शेतकऱ्याच्या खात्यात या कामाची मजुरी म्हणून 4642 रुपयांची रक्कम जमा करण्यात येणार आहे.

कोणाशी कराल संपर्क?

जलतारा योजनेत सहभागी होण्यास इच्छूक शेतकऱ्यांना गावाचे कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षकांशी संपर्क साधून या योजनेची संपूर्ण माहिती घेता येणार आहे.

कागदपत्रे आवश्यक !

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना सात बारा, आठ अ, आधार कार्ड आणि एमआरईजीएसचे जॉबकार्ड आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.


हे आहेत शेतमालाचे राज्यातील आजचे बाजारभाव || bajar bhav today

हे आहेत आजचे काही महत्वाच्या बाजार पेठेतील बाजारभाव 

Bajar Bhav today  

आजचे बाजारभाव !


शेतमाल :कापूस 
COTTON MARKET



Cotton market today





















शेतमाल: कांदा 
KANDA MARKET 



Tur market today
















Soyabin market today

Soyabin market today























शेतमाल : मका 

Maize Market today

Maize Market today
















शेतमाल :उडीद 
Black gram market today


Black gram market today















शेतमाल : ज्वारी

Sorghum Market Today


Sorghum Market Today















शेतमाल : गहू

Wheat Market Today 

Wheat Market Today









शेतमाल : मूग



शेतमाल : हळद/ हळकुंड



 विक्रीबाबत निर्णय घेण्याआधी अथवा बाजार भावाबाबत अधिक माहिती साठी संबंधीत बाजार समितीशी संपर्क साधावा.
#BAJARBHAV

राज्यात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज | havaman Andaj

राज्यात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

havaman Andaj

Havaman Andaj

राज्यात आज 7 मे 2026 पासून पूर्व मौसमी पावसाला सुरुवात होणार आहे. मान्सून च्या निर्मितीला आणि पुढील वाटचालीला अतिशय पोषक आहे.

भारतीय हवामान विभागाने एक हंगामी हवामानाचा अंदाज जाहीर करण्यात आलेला आहे. या अंदाजानुसार 7 मे 2026 पासून राज्यात पूर्वमौसमी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.

7 मे ते 11 मे या कालावधीत पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर पुणे तर मराठवाड्यातील धाराशिव, जालना व विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, अकोला, अमरावती या जिल्ह्यात विजेच्या कडकडाट सह जोरदार पावसाच्या शक्यता वर्तविण्यात आल्या आहेत.

इतर जिल्ह्यातही हलका पाऊस अपेक्षित आहे. या कालावधीत वेगाचा वारा वाहणार आहे. सध्या हिंदी महासागराच्या पश्चिमेला विषुववृत्ताच्या दक्षिणेला हवेचा दाब वाढत असून पूर्व हिंदी महासागरात तापमान 31°c इतके असल्याने मान्सून च्या निर्मिती व पुढील वाटचालीला पोषक वातावरण आहे.



१५ हजार शेतकऱ्यांना १२ कोटींचा पीकविमा मंजूर | Kharip Pikvima 2025 Wardha

१५ हजार शेतकऱ्यांना १२ कोटींचा पीकविमा मंजूर 

Kharip Pikvima 2025 Wardha

खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा मंजूर करण्यात आलेला आहे.

वर्धा जिल्ह्यातील पिक विमा भरलेल्या 62000 शेतकऱ्यापैकी १५३०५ शेतकऱ्यांना 12 कोटी 14 लाख रुपयांचा पिक विमा मंजूर करण्यात आलेला आहे.


खरीप हंगाम 2025 मध्ये वर्धा जिल्ह्यातील कापूस तूर सोयाबीन व इतर पिकासाठी पिक विमा भरलेल्या 62 हजार 664 शेतकऱ्यापैकी १५३०५ शेतकऱ्यांना सोयाबीन या पिकासाठी पिक विमा मंजूर करण्यात आलेला आहे.

एकंदरीत वर्धा जिल्ह्यातील 29 हजार 782 शेतकऱ्यांनी कापूस पिकाकरिता, 8533 शेतकऱ्यांनी तुर पिकाकरिता, तर 24182 शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाकरता आपला पिक विमा काढला होता. सोयाबीन पिकाचा पिक विमा काढलेल्या 24,182 शेतकऱ्यांपैकी 15305 शेतकऱ्यांना हा पिक विमा मंजूर करण्यात आलेला आहे.

वर्धा जिल्ह्यातील एकूण 55 महसूल मंडळापैकी 37 महसूल मंडळामध्ये हा पिक विमा मंजूर करण्यात आलेला असून पाच महसूल मंडळामध्ये पिक विमा नामंजूर करण्यात आलेला असून 13 महसूल मंडळामध्ये पीक विम्याच्या नुकसानीची परिगणना सुरू आहे.

मंजूर झालेल्या पीक विम्यामध्ये आर्वी तालुक्यातील सहा महसूल मंडळातील १४३७ शेतकऱ्यांना, आष्टी तालुक्यातील एक महसूल मंडळातील 310 शेतकऱ्यांना, देवळी तालुक्यातील पाच महसूल मंडळातील 3585 शेतकऱ्यांना हिंगणघाट तालुक्यातील ७ महसूल मंडळातील 2908 शेतकऱ्यांना, समुद्रपूर तालुक्यातील ७ महसूल मंडळातील 3129 शेतकऱ्यांना तर सेलू तालुक्यातील ५ महसूल मंडळातील 2041 वर्धा तालुक्यातील ६ महसूल मंडळातील १८९४ शेतकऱ्यांना हा पिक विमा मंजूर करण्यात आलेला आहे.

कारंजा व आष्टी तालुक्यातील प्रत्येकी दोन आणि वर्धा तालुक्यातील एक अशा पाच महसूल मंडळामध्ये सोयाबीन पिकाकरता पिक विमा लागू झालेला नाही.