कृषी विभागाच्या पुरस्काराचे 1 जुलैला वितरण || Krishi Awards Maharashtra
कृषी विभागाच्या पुरस्कारांचे 1 जुलैला वितरण. Krishi Awards Maharashtra राज्यात शेती क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत विविध प्रतिष्ठित पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी रत्न, वसंतराव नाईक कृषी भूषण, जिजामाता कृषी भूषण आणि उद्यान पंडित यांसारखे महत्त्वाचे पुरस्कार अशा पुरस्कारांचा समावेश आहे. सन २०२३ व २०२४ या दोन्ही वर्षांतील राज्यस्तरीय कृषी पुरस्कार विजेत्यांचा सन्मान एकत्रितपणे करण्यात येणार असून, या सोहळ्यास महाराष्ट्राचे मा.राज्यपाल श्री.जिष्णु देव वर्मा यांना प्रमुख उपस्थितीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, उत्पादनवाढ, शाश्वत शेती, नाविन्यपुर्ण कल्पना आणि कृषी विकासासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, संस्था व कृषी क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात येतो. हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या कृषी दिनाचे औचित्य साधून बुधवार, दि.१ जु...