पोस्ट्स

मे, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

11th Admission 2026 गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्यास मुदत

इमेज
अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्यास मुदत; विद्यार्थ्यांना दिलासा 11th admission 2026 Maharashtra  राज्यात शैक्षणिक वर्ष 2026 27 अंतर्गत होणाऱ्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रिये संदर्भात एक महत्त्वाचा आणि दिलासादायक असा निर्णय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे ज्याच्यामुळे प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे.  आता अकरावी प्रवेशासाठी मूळ गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे अर्थात प्रवेश प्रक्रियेच्या वेळी गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला देण्यात सूट देण्यात आले आहे. राज्यात दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अद्यापही अनेक विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका किंवा शाळांच्या माध्यमातून शाळा सोडल्याचा दाखला देण्यात आलेला नसल्यामुळे अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली होती.  याच पार्श्वावरती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानुसार माध्यमिक व उच्च माध्यमिक शि...

Ladki Bahin लाडक्या बहिणींनो सावधान; फसगत होईल नवीन KYC कधी?

इमेज
लाडक्या बहिणींनो सावधान; फसगत होईल नवीन KYC कधी? Ladki Bahin  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेच्या लाभार्थ्यांना आवाहन 🛑 भूलथापांना बळी पडू नये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ३१ डिसेंबर २०२५ पूर्वी ई-केवायसी करणे आवश्यक होते. ज्या लाभार्थ्यांनी निर्धारित मुदतीत ई-केवायसी पूर्ण केलेली नाही, त्यांचे योजनेअंतर्गत मिळणारे लाभ बंद करण्यात आले आहेत. ई-केवायसी संदर्भात शासनाकडून किंवा महिला व बाल विकास विभागाकडून कोणतेही नवीन निर्देश अथवा अद्ययावत माहिती प्राप्त झाल्यास ती अधिकृत माध्यमांद्वारे तसेच वर्तमानपत्रांद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येईल. मात्र, काही व्यक्ती लाभार्थी महिलांना चुकीची व दिशाभूल करणारी माहिती देत आहेत. "३०० रुपये भरून ऑनलाइन तक्रार दाखल करावी लागते, ती तक्रार मंत्रालयात पाठविली जाते व त्यानंतर लाभ पुन्हा सुरू होतात" अशा प्रकारच्या खोट्या आश्वासनांद्वारे महिलांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांनी अशा कोणत्याही अफवा, भूलथापा किंवा अनधिकृत व्यक्तींच्या सांगण्यावर विश्वास ठेव...

MGNREGA Maharashtra अखेर प्रतीक्षा संपली; मनरेगासाठी महाराष्ट्राला ₹596 कोटींचा हप्ता

इमेज
अखेर प्रतीक्षा संपली; मनरेगासाठी महाराष्ट्राला ₹596 कोटींचा हप्ता mgnrega maharashtra 1st installment 2026 राज्यात मनरेगा अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी हे गेल्या अनेक दिवसापासून केंद्राच्या निधी अभावी अनुदानापासून वंचित आहेत. या विरोधात सध्या सुरु असलेल्या अर्थसंकलीय अधिवेशनात विविध लोकप्रतिनिधींकडून मोठ्या प्रमाणात आवाज उठविण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर राज्याकडून या योजनेच्या निधीसाठी केंद्र सरकारला पाठपुरावा करण्यात आला होता अखेर केंद्र शासनाकडून प्रलंबित असलेला चौथ्या हप्त्याचा निधी वितरीत केला आहे. GR 26.05.2026 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना - महाराष्ट्र अंतर्गत सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाकडून कुशल खर्च व साधन सामग्री करीता प्राप्त केंद्र निधीच्या अनुषंगाने समरुप राज्य हिस्सा वितरीत GR 26.05.2026 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना - महाराष्ट्र अंतर्गत सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाकडून कुशल खर्च व साधन सामग्री करीता प्राप्त केंद्र निधी वितरीत GR 26.05.2026 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रो...

Onion MSP शेतकऱ्यांना मिळणार दिलासा; कांदा साखर प्रश्नावर केंद्र सरकार सकारात्मक

इमेज
साखर, इथेनॉल आणि कांदा प्रश्नांवर केंद्र सकारात्मक; शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा Onion MSP  केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान व केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नवी दिल्ली येथे ऊस व कांदा उत्पादक शेतकरी यांच्या विविध अडचणींसंदर्भात उच्चस्तरीय बैठक पार पडली. साखरेच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करणे, इथेनॉल कोटा वाढवणे, कर्ज पुनर्गठन, व्याज सवलत, शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी, शेतीमालाचे ग्रेडिंग, कांदा बियाण्यांवरील अधिभार आदी शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर या बैठकीत चर्चा झाली. केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या या बैठकीत झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, याबाबत केंद्र सरकार लवकरच अनुकूल निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, साखरेची किमान आधारभूत किंमत वाढवणे गरजेचे असल्याचे सहकार मंत्री अमित शाह यांनी मान्य केले आहे....

जमीन खरेदीसाठी 100 टक्के अनुदान योजना || jamin kharedi anudan yojna maharashtra

इमेज
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग  कर्मवीर दादासाहेब गायकवाड  सबळीकरण व स्वाभिमान योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात jamin kharedi anudan yojna maharashtra सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि. 14 ऑगस्ट 2018 शासन निर्णयान्वये कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना अंतर्गत भूमिहीनांना मिळणार शेतीची खरेदीची संधी; इच्छुक शेतकऱ्यांनी जमीन खरेदी विक्रीसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन.  NEW GR karmavir dadasaheb gaikwad sabalikaran & swabhiman yojana कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत तरतुदींमध्ये अतिरिक्त मार्गदर्शक तत्वांचा समावेश या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील दारिद्रय रेषेखालील भूमिहीन शेतमजुर, विधवा महिला, परितक्त्या महिला, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत पिडीत लाभार्थी यांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढून त्यांचे राहणीमानाचा दर्जा सुधारावा. यासाठी 100 टक्के अनुदानावर 04 एकर कोरडवाहू जमीन किंवा 02 एकर बागायती...

मोठी बातमी! राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले Grampanchayat Election 2026

इमेज
मोठी बातमी! राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले Grampanchayat Election 2026 जर तुम्ही ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी करत असाल, तुम्ही स्वतः उमेदवार असाल किंवा तुमच्या गावात कोणाचं आरक्षण पडणार याकडे तुमचं लक्ष असेल... तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे! राज्यातील तब्बल १४,३१४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आरक्षणाचा अधिकृत कार्यक्रम म्हणजेच वेळापत्रक जाहीर केलं आहे! होय, यामध्ये २०२४ आणि २०२५ मध्ये मुदत संपलेल्या, तसेच २०२६ या चालू वर्षात मुदत संपणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींचा समावेश आहे.  टप्पा २: आरक्षण सोडत काढणे (१२ जून २०२६, शुक्रवार) 🌟  ​या दिवशी तहसीलदार यांनी ठरवून दिलेल्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली प्रत्यक्ष ग्रामसभा होईल. यात एस.सी. (SC), एस.टी. (ST), ओ.बी.सी. (OBC) आणि महिला (सर्व प्रवर्ग) यांच्या जागांची आरक्षण सोडत (लॉटरी) काढली जाईल. ​टप्पा ३: जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता (१७ जून २०२६, बुधवार) ​प्रभागनिहाय आरक्षणाचा जो मसुदा (प्रारूप अधिसूचना - नमुना ब) तयार होईल, त्याला जिल्हाधिकारी १७ जून...

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई तातडीने द्या - कृषिमंत्री | Beed Pikvima 2025

इमेज
बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2025 च्या पिकविम्याची नुकसान भरपाई तातडीने द्या - कृषीमंत्री  Beed Pikvima 2025 खरीप हंगाम 2025 मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन ही बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप ही पीकविमा नुकसान भरपाई मिळालेली नाही. जिल्ह्यात या संदर्भात मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहेत, शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष आहे. याच पार्श्वभूमीवर 26 मे 2026 रोजी राज्याच्या कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बीड जिल्ह्याच्या पीकविमा भरपाई संदर्भात मंत्रालयात एक बैठक पार पडली. या बैठकीला आमदार विजयसिंह पंडित, कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह, कृषी संचालक विनयकुमार आवटे तसेच शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. याच बैठकीत कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांना वेळेत आणि न्याय्य नुकसानभरपाई मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य करत प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत असे स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिले आहेत. राज्यात सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना उत्पादन आधारित पद्धतीने आणि पीक कापणी प्रयोगांच्या आधारे राबविण्यात येत आहे.  बीड जिल्ह्यात या योजनेची अं...

पीकविमा अर्जातील त्रुटी दूर करण्याचे आवाहन | Kharip Pikvima 2025

इमेज
पीकविमा अर्जातील त्रुटी दूर करण्याचे आवाहन Kharip Pikvima 2025 खरीप पीकविमा अर्जातील त्रुटी तातडीने दूर करा ; ४१०२ अर्ज पुनर्पडताळणीसाठी परत आलेले असून या अर्जातील त्रुटी दूर करण्याचे आवाहन. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२५ अंतर्गत विमा भरलेल्या काही शेतकऱ्यांचे अर्ज कागदपत्रांतील किरकोळ त्रुटींमुळे विमा कंपनीमार्फत अपात्र ठरविण्यात आले होते.या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत संबंधित विमा कंपनीला अपात्र अर्जांची पुनश्च छाननी करून पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्याअनुषंगाने केंद्र शासनस्तरावरून एकूण ४१०२ अर्ज त्रुटी पूर्ततेसाठी परत प्राप्त झाले आहेत. शेतकरीनिहाय अर्जांची यादी तालुकास्तरावर तसेच आपले सरकार सेवा केंद्र धारकांकडे उपलब्ध करून देण्यात येत आहे.या अर्जांमध्ये प्रामुख्याने आधार क्रमांकातील तफावत,बँक खात्याची अपूर्ण माहिती,सातबारा उताऱ्यावरील तपशीलातील विसंगती,पीक पेरणी तपशीलातील त्रुटी तसेच आवश्यक कागदपत्रांची अपूर्णता आढळून आली आहे. संबंधित शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ वेळेत...

राज्यात आता पाण्याचा ७/१२; महसूल विभागाचा नवा प्रयोग | Jal 7/12

इमेज
राज्यात आता पाण्याचा ७/१२; महसूल विभागाचा नवा प्रयोग  Jal 7/12 मित्रांनो आपण जमिनीच्या ७/१२ बद्दल नेहमीच ऐकतो, पण शासनाने आता पाण्याचा 7/12 आणण्याबाबत घोषणा केली आहे. मग काय आहे 'पाण्याचा सातबारा' (जल ७/१२) हा सर्वांना पडलेला एक मोठा प्रश्न आहे. आज आपण हेच जाणून घेणार आहोत. पाण्याचा 7/12 ही खरोखरच एक अत्यंत अभिनव संकल्पना असून येणारे भविष्य लक्षात घेता काळाची पाऊल ओळखणारी संकल्पना आहे. महाराष्ट्राला वारंवार अनेक भागात पाणीटंचाई आणि दुष्काळाचा सामना करावा लागतो, यासाठी पाण्याचा शास्त्र शुद्ध ताळेबंद मांडणे अतिशय गरजेचे आहे. जल ७/१२ म्हणजे नेमके काय? आपण जसे जमिनीच्या ७/१२ वरून त्या जमिनीची मालकी, क्षेत्रफळ आणि पिकांची नोंद याबद्दल समजतो, तसेच 'जल ७/१२' मुळे एखाद्या गावातील किंवा शहरातील पाण्याचे स्रोत किती आहेत? (विहिरी, कूपनलिका, नद्या, तलाव इत्यादी) याबद्दल समजू शकतो. याचबरोबर त्या गावात / शहरातपाण्याची उपलब्धता किती आहे? (सध्या किती पाणी साठा उपलब्ध आहे), त्या गावात / शहरातपाण्याचा वापर कसा होतोय? (पिण्यासाठी, शेतीसाठी की उद्योगांसाठी), या भागात भविष्याती...

विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्रासाठी ३० सप्टेंबर ची मुदत; अन्यथा मानधन बंद || Niradhar Yojana 2026

इमेज
विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्रासाठी ३० सप्टेंबर ची मुदत; अन्यथा मानधन बंद Divyang Yojana 2026 विविध विशेष सहाय्य योजनांच्या सर्व लाभार्थ्यांनी 30 सप्टेंबरपूर्वी ह्यात प्रमाणपत्र आणि दिव्यांग लाभार्थ्यांनी वैश्विक ओळखपत्र वेळेत सादर करावे, असे आवाहन समाजकल्याण विभागाकडून करण्यात आले आहे. राज्यातील विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी करण्यासाठी वर्षातून एकदा ह्यात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. केंद्र पुरस्कृत योजनेतील लाभार्थ्यांसाठी सरकारने बेनिफिशरी सत्यापन ॲप विकसित केले आहे.  लाभार्थी स्वतःच्या मोबाईलवर हे ॲप डाऊनलोड करून ऑनलाइन पद्धतीने ह्यात प्रमाणपत्र मोफत सादर करू शकतात. स्वतःचा मोबाईल नसल्यास लाभार्थी आपल्या नातेवाईकांमार्फत किंवा गावातील ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायतमधील संगणक परिचालक, कर्मचारी यांच्या मदतीने हे काम पूर्ण करू शकतील. लाभार्थ्यांना सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र किंवा नागरी सेवा केंद्रावर जाऊनही हे प्रमाणपत्र सादर करता येईल. येथे प्रक्रिया केल्यास 50 रूपये सेवा शुल्क ...

हे आहेत शेतमालाचे राज्यातील आजचे बाजारभाव || bajar bhav today

इमेज
हे आहेत आजचे काही महत्वाच्या बाजार पेठेतील  बाजारभाव  Bajar Bhav today   शेतमाल : कापूस  COTTON MARKET शेतमाल:  कांदा  KANDA MARKET  शेतमाल :तूर  Tur Market सोयाबिन   Soyabin market today शेतमाल : मका  Maize Market today शेतमाल : उडीद  Black gram market today शेतमाल :  ज्वारी Sorghum Market Today शेतमाल :   गहू Wheat Market Today  शेतमाल :   मूग शेतमाल : हळद/ हळकुंड  विक्रीबाबत निर्णय घेण्याआधी अथवा बाजार भावाबाबत अधिक माहिती साठी संबंधीत बाजार समितीशी संपर्क साधावा . #BAJARBHAV