शेतपिकाच्या झालेल्या नुकसानीसाठी मदत वितरित | ativrushti nuksaan bharpai 2021

गारपीट व अवेळी पावसामुळे शेतपिकाच्या झालेल्या नुकसानीसाठी  निधी वितरीत !

ativrushti nuksaan bharpai 2021



राज्यात जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवली होती. यात शेतपिकांच्या नुकसानाकरिता बाधितांना आर्थिक मदत म्हणून एकूण 125 कोटी 07 लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. या मदतीमुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 



अतिवृष्टीमुळे शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता बाधितांना मदतीचे वाटप करण्यासाठी 

कोकण विभागासाठी ४ कोटी १० लाख रुपये, 

नाशिक विभागासाठी ०.३८ लाख रुपये, 

पुणे विभागासाठी २४ कोटी ३४ लाख रुपये,  

अमरावती विभागासाठी ५५ कोटी २६ लाख रुपये,  

औरंगाबाद विभागासाठी ३६ कोटी ३९ लाख, 

नागपूर विभागासाठी ४ कोटी ९६ लाख रुपये 

याप्रमाणे एकूण १२५ कोटी ०७ लाख रुपये इतका निधी मंजूर झाला आहे.

GR 

👇



वर्ष २०२१ मध्ये गारपीट व अवेळी पावसामुळे  कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या विभागातील जिल्ह्यांमध्ये शेतीपिकांचे- फळबागांचे  मोठे नुकसान झाले होते ,
आणि याच अनुषंगाने आज  १६ फेब्रुवारी २०२२ रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेऊन २३ जिल्ह्यासाठी १०३५ कोटी वितरीत करण्यास मंजुरी दिली आहे.


शासन निर्णय येथे पहा 
तुमच्या जिल्ह्याला किती मिळणार 









२६ ऑक्टोबर २०२१ रोजी एक शासन निर्णय घेऊन ऑगस्ट सप्टेंबर २०२१ मध्ये बाधित झालेल्या १४ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत वितरित करण्यासाठी २८६० कोटी मदत वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे 
ही मदत ७५% प्रमाणात वितरित करण्यात आली आहे.
उर्वरित २५% दुसऱ्या टप्प्यात वितरित करण्यात येईल.

ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय महसूल व वन विभागाने 26 ऑक्टोबर 2021 रोजी निर्गमित केला आहे.

ऑगस्ट आणि सप्टेंबर 2021 या काळात अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी आणि राज्य शासानाच्या निधीमधून निश्चित केलेल्या वाढीव दरानुसार आवश्यक निधीपैकी 75 टक्के एवढा असा एकूण 2 हजार 860 कोटी 84 लाख 7 हजार रुपये इतका निधी विभागीय आयुक्त यांच्यामार्फत जिल्ह्यांना वितरीत करण्यात येणार आहे. नुकसानीचे पंचनामे करण्यात आल्यानंतर लाभार्थी निश्चित करण्यात यावेत. शेतकऱ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी आणि मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

GR 21/12/2021 

ऑगस्ट ते सप्टेंबर, २०२१ पर्यंत राज्यातील विविध जिल्हयात अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत (विभागीय आयुक्त, नाशिक)....









तर ०६ ऑक्टोबर २०२१ रोजी दोन महत्वपूर्ण शासन घेऊन मार्च, एप्रिल व मे २०२१ व जुलै २०२१ मध्ये अतिवृष्टी मुळे शेती पिकांचे नुकसान  शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे. 


यात मार्च, एप्रिल व मे २०२१ साठी रुपये १२२ कोटी २६ लाख तर जुलै २०२१ साठी रुपये ३६५ कोटी ५७ लाख मदत  करण्यात आली आहे. 

महसूल व वन विभागाने निधी मंजुरीचा शासन निर्णय निर्गमित केला आहे.


शासन  निर्णय येथे पहा 







राज्यात जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवली होती. यात शेतपिकांच्या नुकसानाकरिता बाधितांना आर्थिक मदत म्हणून एकूण 365 कोटी 67 लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. या मदतीमुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

अतिवृष्टीमुळे शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता बाधितांना मदतीचे वाटप करण्यासाठी 

कोकण विभागासाठी ८ कोटी ५१ लाख रुपये, 

नाशिक विभागासाठी १ लाख रुपये, 

पुणे विभागासाठी १५० कोटी १२ लाख रुपये,  

अमरावती विभागासाठी ११८ कोटी ४१ लाख रुपये,  

औरंगाबाद विभागासाठी ७७ कोटी ९७ लाख, 

नागपूर विभागासाठी १० कोटी ६५ लाख रुपये 

याप्रमाणे एकूण ३६५ कोटी ६७ लाख रुपये इतका निधी मंजूर झाला आहे.

गारपीट व अवेळी पावसामुळे  मार्च, एप्रिल व मे २०२१ या कालावधीत कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या विभागातील जिल्ह्यांमध्ये शेतीपिकांचे फळपिकांचे नुकसान झाले.  गारपीट व अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने  शेतपिकाच्या नुकसानीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यासाठी १२२ कोटी २६ लाख ३० हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. ज्या शेतीचे ३३ टक्के किंवा त्याहून अधिक नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे.

गारपीट व अवेळी पावसामुळे शेतीपिकाच्या झालेल्या नुकसानासाठी मदत करण्याकरिता केंद्रीय आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य  आपत्ती प्रतिसाद निधी दरानुसार मदत अनुज्ञेय करून एकूण १२२ कोटी २६ लाख ३० हजार इतका निधी विभागीय आयुक्त यांच्यामार्फत जिल्ह्यांना वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

गारपीट व अवेळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यासाठी

 कोकण विभागासाठी २९ लाख ३० हजार रुपये, 

पुणे विभागासाठी ३ कोटी १६ लाख ७५ हजार रुपये, 

नाशिक विभागासाठी ५९ कोटी ३६ लाख ३४ हजार रुपये, 

औरंगाबाद  विभागासाठी १५ कोटी ५१ लाख ५४ हजार रुपये, 

अमरावती विभागासाठी ३८ कोटी ८७ लाख ५६ हजार रुपये, 

नागपूर विभागासाठी ५ कोटी ४ लाख ८१ हजार रुपये  इतका निधी मंजूर झाला आहे.

ativrushti nuksaan bharpai