पावसाळी अधिवेशनापूर्वी शासनाचा मोठा निर्णय; मंत्रालय प्रवेशासाठी नवा नियम
मंत्रालय प्रवेशासाठी छापील पास बंद, चेहरा पडताळणी द्वारेच प्रवेश.
Monsoon Session 2026 Maharashtra
राज्याचे पावसाळी अधिवेशन 22 जून 2026 पासून विधान भवन मुंबई येथे सुरू होणार आहे. या अधिवेशनादरम्यान विधान भवन परिसरामध्ये होणारे गर्दी नियंत्रित असावी याचबरोबर सुरक्षाची कारणे यास्तव राज्य शासनाच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे.
22 जून ते 10 जुलै 2026 या दरम्यान पार पडणाऱ्या या पावसाळी अधिवेशनामध्ये प्रथमच एकही प्रवेश पत्रिका छापण्यात येणार नसून प्रत्येक प्रवेश हा चेहरा पडताळणी पद्धतीद्वारे दिला जाणार आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान विधान भवन परिसरामध्ये होणारे गर्दी नियंत्रित ठेवण्यासाठी तसेच सुरक्षा यंत्रणेला तपासणी संदर्भात सुलभता आणण्यासाठी पावसाळी अधिवेशनामध्ये छापील प्रवेश पत्र ऐवजी आता चेहरा पडताळणी पद्धती अवलंबिण्यात येणार आहे.
यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री तसेच अन्य सर्व संबंधित आस्थापना, वार्तांकनासाठी येणारी न्यूज चॅनलचे रिपोर्टर याचप्रमाणे आयएएस, आयपीएस आणि इतर सर्व अधिकारी कर्मचारी, सचिव विशेष कार्य अधिकारी, सर्व स्वीय सहाय्यक या सर्वांना या संदर्भात विधानमंडळ सचिवालयातर्फे सुचित करण्यात आलेले आहे.