येत्या ४८ तासात राज्यात तुफानी पाऊस; २६ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट
Monsoon Forecast 2026

गेल्या दोन दिवसापासून राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस हजेरी लावत आहे. हवामान विभागाच्या माध्यमातून राज्यात 15 जून पर्यंत मान्सूनचा वेग मंद राहील असे अपडेट दिलेले आहेत.
मात्र येत्या दोन ते तीन दिवसात राज्यात ठिकठिकाणी जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे. एकंदरीत राज्याच्या काही भागात गेल्या दोन दिवसापासून राज्याच्या विविध भागात जोरदार वाऱ्यासह विजेच्या कडकटासह मोठा पाऊस पडत आहे मात्र काही भागात अद्याप पावसानं हजेरी लावलेली नाही.
खरिपाच्या पेरणीच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पावसाची प्रतीक्षा केली जात आहे.
यातच सोमवारी आठ जून 2026 रोजी मान्सूनच्या संदर्भात हवामान विभागाच्या माध्यमातून नवा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
या अंदाजानुसार कोकणातील पालघर जिल्ह्यामध्ये हवामान दमट राहणार असून दुपारनंतर काही भागांमध्ये विजेच्या कडकडासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर ठाणे व मुंबई या दोन्ही जिल्ह्यात मध्यम पावसाचा रायगड जिल्ह्यामध्ये तुरळ ठिकाणी जोरदार पावसाचा रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील पावसासाठी येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे.
मध्य महाराष्ट्रात पुण्यात सह सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम राहील आणि याच्यामध्ये येत्या 48 तासांमध्ये वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे या भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाच्या शक्यता वर्तवण्यात आलेले आहेत.
उत्तर महाराष्ट्रात मात्र अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे आणि साधारणपणे सर्वत्र हवामान कोरडे राहील नंदुरबार धुळे जळगाव या तीन जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहील. तर नाशिक आणि अहिल्यानगर मध्ये काही ठिकाणी तुरळ पावसाच्या शक्यता वर्तवण्यात आलेल्या आहेत.
मराठवाड्यात मात्र छत्रपती संभाजीनगर आणि जालना वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे तर पुढील 48 तासांमध्ये मराठवाड्यामध्ये मान्सून पूर्व परिस्थितीमुळे पावसाचे धुमशान सुरू राहणार आहे.
छत्रपती संभाजी नगर जालना परभणी सह मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात येथे 48 तासांमध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे सोमवार आणि मंगळवार या दोन्ही दिवसासाठी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
विदर्भात देखील अशीच परिस्थिती दिसून येणार आहे यवतमाळाने वर्धा या दोन जिल्ह्यांमध्ये अध्यापित पावसाला मनावी तसेच सुरुवात झालेली नाही मात्र येथे 48 तासांमध्ये अकोला अमरावतीसह विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे या काळामध्ये वादळी वारा सुद्धा राहू शकतो याच्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असा आव्हान देखील करण्यात आलेला आहे.