या शेतकऱ्यांना हेक्टरी २२,०००, फळपीक ही मिळणार || Amba Kaju Nuksan Bharpai

नैसर्गिक आपत्ती मुळे बाधित आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ₹२२,०००; फळपीक विमा ही मिळणार 

Amba Kaju Nuksan Bharpai 2026

राज्यात चालू वर्षात झालेल्या वातावरणातील बदलामुळे कोकणातील प्रमुख पीक असलेल्या अंबा आणि काजू पिकाला खूप कमी प्रमाणात फळधारणा झाली आहे, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या झालेल्या नुकसानी संदर्भात कोकणातील दोन्ही सभागृहातील लोकप्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांसमवेत 17 मार्च 2026 रोजी बैठक झाली होती. 

या बैठकीनंतर शासनाने क्षेत्रीय पातळीवर झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल कृषी विभाग व डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून मागविला आहे. सुकृत दर्शनी  राज्यात आंबा काजू या फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे.


सन २०२५-२६ मध्ये कोकणात पालघर ठाणे, रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आंबा पिकाखाली १,२४,५७१  हेक्टर क्षेत्र  आंबा लागवडीखाली आहे. प्रधानमंत्री फळ पीक विमा योजना आंबिया बहार मध्ये आंबा या पिकासाठी एकूण 302 महसूल मंडळ अधिसूचित करण्यात आलेली असून 35,580 हेक्टर क्षेत्रासाठी 80418 शेतकऱ्यांनी हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहभाग घेऊन आंबा पिकाचा विमा उतरवला आहे.

आंबा पिकासाठी सद्यस्थितीत प्रधानमंत्री फळ पीक विमा योजनाअंतर्गत नुकसानीचे कमी तापमान व जास्त तापमान हे ट्रिगर लागू झालेले आहेत. यात कमी तापमान या ट्रिगर साठी कोकणातील साधारण 302 पैकी 155 महसूल मंडळात नुकसान भरपाई देह झाली आहे . कमी तापमानासाठी ६०७१ ते  ३४००० रुपये प्रति हेक्टर अशी नुकसान भरपाई मिळते तर जास्त तापमानासाठी १७१७१ ते ६८००० रुपये प्रति हेक्टर इतकी नुकसान भरपाई मिळते.

याचप्रमाणे अवेळी पाऊस, गारपीट, वेगाचा वारा पासून नुकसान घटकांसाठी आंब्याला पंधरा मे पर्यंत विमा संरक्षण कालावधी आहे त्यामुळे या घटकापासून नुकसान झाल्यास या नुकसान भरपाईत वाढ अपेक्षित आहे. आंब्यासाठी एकूण विमा संरक्षित रक्कम दोन लाख 27 हजार प्रति हेक्टर आहे

याचप्रमाणे १,७५,१४० हेक्टर क्षेत्र काजू लागवडीखाली आहे, काजू पिकासाठी एकूण 198 महसूल मंडळ अधिसूचित करण्यात आली असून 7880.19 हेक्टर क्षेत्राचा 15769 शेतकऱ्यांनी फळपिक विमा उतरवलेला आहे.

फळपीक विमा योजनेअंतर्गत काजू साठी कमी तापमान हा ट्रिगर लागू झाला असून त्यासाठी कोकणातील साधारण 198 पैकी 150 महसूल मंडळात नुकसान भरपाई देय झाली आहे ही नुकसान भरपाई कमी तापमानासाठी कमीत कमी 16800 तर जास्तीत जास्त 42 हजार रुपये प्रति हेक्टरी अशी आहे काजू पिकासाठी विमा संरक्षित रक्कम रुपये १,६०,००० प्रती हेक्टरी आहे.

कोकणातील आंबा व काजू पिकाच्या नुकसानी पोटी फळ पिक विमा न उतरवलेल्या परंतु ज्या शेतकऱ्यांचा नुकसान झालेला आहे त्यांना देखील आर्थिक मदत देण्याची शासनाची घोषणा केली आहे. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानीचा आढावा घेण्याचे निर्देश दिलेले आहेत नुकसानीचा  तपशील समोर आल्यानंतर शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात येणार आहे.

नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना किमान हेक्टरी रुपये २२,००० मदत केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. विमा काढला त्यांना 42 हजार रुपये तर न विमा काढलेल्या शेतकऱ्यांना २२००० रुपये मदत मिळेल अशी माहिती त्यांनी सभागृहात दिली.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

असा असेल नाशिक-सोलापूर-अक्कलकोट महामार्ग | surat-chennai Greenfield expressway route map