या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासनाचा मोठा दिलासा | Grampanchayat karmachari Maharashtra

 

ग्रामपंचायतीच्या सफाई कर्मचाऱ्यांना नवनिर्मित नगरपरिषद/नगर पंचायतीत सामावून घेणार – नगरविकास विभागाचा निर्णय, GR आला.

ग्रामपंचायत कर्मचारी



राज्यातील ज्या ग्रामपंचायतींचे नगर परिषद अथवा नगर पंचायतीत रुपांतर झाले आहे, त्या ग्रामंचायतीतील सफाई कर्मचाऱ्यांना या नवनिर्मित नगर परिषदा व नगर पंचायतींमध्ये रिक्त जागांनुसार सामावून घेण्याचा निर्णय आज नगरविकास विभागाने घेतला आहे.

 

या संदर्भातील शासन निर्णय आज सोमवार ६ डिसेंबर २०२१ प्रसिद्ध करण्यात आला आहे.

नवनिर्मित नगरपरिषदा / नगरपंचायतींच्या आकृतीबंधातील वर्ग-3 व वर्ग-4 च्या मंजूर व रिक्त पदावर तत्कालीन ग्रामपंचायतींमधील सफाई कर्मचाऱ्यांचे स


या शासन निर्णयाचा लाभ राज्यभरातील १४७७ सफाई कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे.

राज्यातील या नवनिर्मित नगर परिषद व नगर पंचायतींच्या आकृतीबंधात सफाई कर्मचाऱ्यांची नियमित पदे मंजूर नसल्यामुळे ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत सफाई कर्मचाऱ्यांचे समावेशन झालेले नाही.

विविध नवनिर्मित नगर परिषदा व नगर पंचायतींमध्ये ग्रामपंचायत कालीन सुमारे १४७७ सफाई कर्मचारी कार्यरत आहेत. या नगर परिषदा व नगर पंचायतींमध्ये तत्कालीन ग्रामपंचायतींच्या कर्मचाऱ्यांच्या समावेशनाबाबतच्या शासनाच्या प्रचलित धोरणानुसार समावेशनाची प्रक्रिया पूर्ण होऊन देखील मंजूर व रिक्त असलेल्या वर्ग ३ व वर्ग ४ च्या पदांवर तत्कालीन ग्रामपंचायतींमधील सफाई कर्मचाऱ्यांचे समावेशन करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्याला आता मंजुरी देण्यात आली आहे. 

या शासन निर्णयानुसार मंजूर व रिक्त जागांवर विहीत शैक्षणिक व तांत्रिक अर्हता प्राप्त असलेल्या इच्छुक सफाई कर्मचाऱ्यांचे समावेशन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. 

 या शासन निर्णयानुसार विहीत तांत्रिक अर्हता पूर्ण न करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना यासाठी महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिक प्रशिक्षण व संशोधन संस्था (मित्रा) या संस्थेच्या माध्यमातून ६ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून त्यांचे समावेशन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.