या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा २५% अग्रीम विमा रकमेचा मार्ग मोकळा !

२५% अग्रीम विमा रकमेचा मार्ग मोकळा !


उस्मानाबाद जिल्ह्यातील पीकविमा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने कृषी विभागाचा नुकसानीबाबतचा अहवाल ग्राह्य धरण्याचे मान्य केल्याने आता उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व बाधित (कृषी खात्याच्या अहवालानुसार ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या) महसुली मंडळातील शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.



उस्मानाबाद जिल्ह्यातील पीक विमा कंपनीच्या स्थानिक अधिकाऱ्याने सुरुवातीला अहवालावर तांत्रिक अडचणीची समस्या कायम ठेवत अहवालावर सही केली होती.  मात्र उस्मानाबाद चे आमदार मा राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठ पुराव्याने कंपनीला अखेर माघार घ्यावी लागली आहे. 
पीक विमा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्मानाबाद जिल्ह्यातील कृषी विभागाच्या आकडेवारी नुसार ५० टक्क्यांहून अधिक नुकसान झाले असल्याचे मान्य करत या नुकसानीच्या आकडेवारी च्या अहवालावर स्वाक्षरी केली आहे.

स्थानिक अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सदर नुकसान ५०% च्या आत आहे असे लिहून प्रथम त्यांनी खोडा घातला होता. मात्र हे विमा प्रतिनिधी कृषी क्षेत्रातले तज्ञ नाहीत हे आमदाराच्या माध्यमातून प्रखरपणे लक्षात आणून दिल्यानंतर विमा कंपनीच्या वरिष्ठाने नुकसानीच्या बाबत आपले म्हणणे बाजूला ठेवत कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार ५०% पेक्षा जास्त नुकसान झाले आहे हे मान्य करत या अहवालावर स्वाक्षरी केली आहे.

हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये ५०% पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर नुकसान भरपाईच्या प्रमाणात विमाधारक शेतकऱ्यांना २५% मर्यादेपर्यंत आगाऊ रक्कम देण्यात यावी अशा पीक विमा योजनेच्या नियमानुसार असे आदेश कृषी आयुक्त यांनी एक पत्रक काढून दिलेले आहेत.


यामुळे आता उस्मानाबाद जिल्ह्यातील अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ही आगाऊ रक्कमेची नुकसान भरपाई मिळण्यास मदत होणार आहे,
ही नुकसान भरपाई ची रक्कम कंपनीने एक महिन्याच्या आत शेतकऱ्यांना द्यावी यासाठी आपण प्रयत्नशील राहू अशी माहिती ही, आमदार राणा पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे.