राज्यात पुन्हा ‘महा आवास अभियान’
Maha Awas abhiyan Gramin 2021
राज्यात २०२० मध्ये राबविण्यात आलेले महा आवास अभियान यशस्वी झाल्याने सन २०२१ मध्ये हि 20 नोव्हेंबर या ‘राष्ट्रीय आवास दिना’चे औचित्य साधून महा आवास अभियान 2021-22 राबविण्याचा निर्णय आज १६ नोव्हेंबर २०२१ रोजी एक शासन निर्णय घेऊन शासनाने घेतला आहे.
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत विविध आवास योजनांमध्ये गतिमानता व गुणवत्ता वाढीसाठी राज्यात राबविण्यात येत असलेल्या महाआवास अभियान-ग्रामीण 2021-22 योजनेस मुदतवाढ देण्यात आली आहे.
महाआवास अभियान ग्रामीण यास 31 मार्च पर्यंत मान्यता देण्यात आली होती. आता हे अभियान राबविण्यासाठी 30 जून 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत विविध आवास योजनांमध्ये गतिमानता वाढीसाठी राज्यात दिनांक 20 नोव्हेंबर, 2021 ते 31 मार्च, 2022 या कालावधीत ‘महा आवास अभियान – ग्रामीण ( Maha Awas abhiyan Gramin 2021 ) 2021-22’ राबविण्यात
👇👇
महा आवास अभियानात अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत ज्यात
भूमीहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देणे
- घरकुलांना उद्दिष्टाप्रमाणे 100 टक्के मंजूरी देणे
- पहिल्या हप्त्याचे 100 टक्के वितरण
- ग्रामीण गवंडी प्रशिक्षण
- डेमो हाऊसेस
- विविध शासकीय योजनांशी कृती संगम
- बँकेचे कर्ज मेळावे घेणे
- बहुमजली गृहसंकुले,
- भूमीहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देण्यासाठी लँण्ड बँक,
- वाळू उपलब्ध करुन देण्यासाठी सँण्ड बँक,
- वाळूला पर्यायी साहित्य वापरण्यासाठी प्रोत्साहन,
- किफायतशीर बांधकाम तंत्रज्ञान,
- रेन वॉटर हार्वेस्टींग,
- सौर उर्जा साधन व नेट बिलींग इ. चा वापर आहेत.
इ. नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार
याचबरोबर या योजनेसाठी २०२१ चा केंद्र व राज्य शासनाच्या पहिला हप्ता साठी रु ९०० कोटी एवढा निधी देखील वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
Maha Awas abhiyan Gramin 2021