‘मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना’ | Matoshri gram samruddhi shet - panand raste yojana


शेतकऱ्यांनो आता सरपंचांच्या मागे लागा!! शेत रस्त्यासाठी सरकारचा मोठा निर्णय, 

'मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना’ 

Matoshri gram samruddhi shet - panand raste yojana 



Matoshri gram samruddhi shet - panand raste yojana 



 राज्यातील गावा-गावात शेत रस्ते, पाणंद रस्ते तयार करण्यासाठी ‘मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना’ राबविण्यास ११ नोव्हेंबर २०२१ रोजी एक शासन निर्णय घेऊन मंजुरी देण्यात आली आहे



GR 11 November 2021

👇

विविध योजनांच्या अभिसरणामधून मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/ पाणंद रस्ते योजना राबविणेबाबत ..


 राज्यातील शेतकरी आणि गावकरी समृध्द व्हावेत या दृष्टीकोनातून “मी समृध्द तर गाव समृध्द” आणि “गाव समृध्द तर माझा महाराष्ट्र समृध्द” ही संकल्पना मनरेगा व राज्य रोहयोच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. 



सद्यस्थितीत राज्यात पालकमंत्री शेत,पाणंद रस्ते योजना राबविण्यात येत आहे. ही योजना राबवितांना येणाऱ्या अडचणी दूर करुन या योजनेतील कामांसाठी मनरेगामधून आवश्यक असा निधी उपलब्ध व्हावा यासाठी मनरेगा आणि राज्याची रोहयो यांचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे. या यातून मनरेगामध्ये होणाऱ्या विविध कामांमधील अकुशल व कुशलच्या संयोजनातून शेत-पाणंद रस्ते बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या योजनेचे नामकरण ‘मातोश्री ग्राम समृद्धी शेत, पाणंद रस्ते योजना’असे करण्यात आले आहे. 

मंजूर शेत रस्ता यादी


राज्यात शेत-पाणंद रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर गरज आहे. रस्त्यांअभावी शेतकऱ्यांना तयार पीक बाहेर काढून साठवणे व बाजारात विकणे अवघड जाते.  पावसाळ्यातील पीके आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असली तरी रस्त्याअभावी ती पिकविण्याचा विचार करता येत नाही. पाणंद रस्ते नसल्यामुळे शेतकऱ्यांना विविध पीक घेण्यात मोठा अडसर होतो आणि म्हणूनच हा निर्णय घेण्यात आला.

तसेच या योजनेच्या उद्दिष्टानुसार रोहयो अंतर्गत मागेल त्याला अकुशल रोजगार उपलब्ध करुन देणे व ग्रामीण भागात सामूहिक उत्पादक मत्ता व मूलभूत सुविधा निर्माण करता येणार आहे. या योजनेमुळे सर्व शेतांपर्यत योग्य गुणवत्तेचे बारमाही वापरता येतील असे शेत रस्ते, पाणंद तयार करता येणार आहेत. प्रत्येक गावात सरासरी 5 किलोमीटर्सच्या शेत, पाणंद रस्त्यांची गरज आहे. राज्यात अशा रितीने राज्यात 2 लाख किलोमीटर्सचे रस्ते बांधता येणार आहेत.

या योजने अंतर्गत अस्तित्वातील शेत/पाणंद कच्च्या रस्त्यांचे मजबुतीकरण करणे, रस्ता अतिक्रमणमुक्त करून कच्चा व पक्का रस्ता एकत्रितपणे करणे अशी कामे घेता येणार आहे. राज्यातील सर्व शेत/पाणंद रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (जिल्हा परिषद आणि शासन) मापदंडाप्रमाणे बांधण्यात येणार आहेत. 

यात फक्त जागेच्या उपलब्धतेप्रमाणे रुंदीमध्ये फरक पडेल. मात्र रस्त्यांची उंची, खडीचे आकार, खडीच्या परताची जाडी, रस्त्याच्या दोन्ही बाजूचे निचऱ्यासाठीचे नाले, रस्त्यांच्या बाजूला वृक्ष लागवड, गुणवत्तेची चाचणी इत्यादी सर्व बाबी मानक मापदंडाचे असणार आहेत.

प्रत्येक रस्त्याच्या कामावर अकुशल-कुशल खर्चाचे प्रमाण 60:40 राखण्यासाठी राज्य रोहयोतून पूरक कुशल निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

या कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मानकाप्रमाणे प्रस्तावित दर्जाचे रस्ते तयार करण्यासाठी अंदाजपत्रके बनवण्यात येईल. यामध्ये मनरेगा-कुशल घटक, अकुशल घटक राज्य रोहयो- कुशल घटक याप्रमाणे खडीकरणासह पक्क्या रस्त्याचे प्रतिकिलोमीटर अंदाजपत्रक अंदाजे 23 लाख 84 हजार इतके

 तर मुरमाच्या पक्क्या रस्त्याचे प्रतिकिलोमीटर अंदाजपत्रक अंदाजे  9 लाख 76 हजार रुपये इतके होते. तथापि ज्या ज्या वेळी ‘डीएसआर’ बदलेल त्याप्रमाणे अंदाजपत्रक बदलेल. शेत/पाणंद रस्ता तयार करण्यासाठीचे मापदंड निश्चित करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. दरम्यानच्या कालावधीत ग्राम विकास विभागाने ग्रामीण रस्ते तयार करण्यासाठी विहित केलेले मापदंड लागू राहतील. रस्ते तयार करण्यासाठीच्या सुस्पष्ट सूचना शासन निर्णयात देण्यात आल्या आहेत.

शेत/पाणंद रस्ते  ग्राम पंचायत,  जिल्हा परिषद बांधकाम विभाग/उप विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग/उप विभाग, वन जमीन असेल तेथे वनविभागामार्फत तयार करण्यात येतील. ग्रामपंचायतीने रस्त्यांचा आराखडा ग्रामसभेच्या मंजूरीने 31 मेपर्यंत तयार करुन गटविकास अधिकाऱ्यांकडे सादर करायचा असून ते तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या शेत/ पाणंद रस्त्यांची यादी 15 जूनपर्यंत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर करतील.

 त्यानंतर त्यांच्याकडून रोहयो सचिव आणि सचिवांकडून ग्रामविकास मंत्री यांच्याकडे 31 जुलैपर्यंत सर्व राज्यातील ग्रामपंचायतींच्या आराखड्यांची यादी पाठवली जाऊन ग्रामपंचायत निहाय शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांना पूरक निधी मंजूर करावयाच्या यादीस 15 ऑगस्टपर्यंत मान्यता देतील.

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज || MPBCDC Scheme

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

MPBCDC Scheme



 

* बीज भांडवल योजना

*वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना 

*गट कर्ज व्याज परतावा योजना 

*थेट कर्ज योजना (महामंडळ)


महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी महामंडळाच्या विविध योजनांकरिता कर्ज प्रस्ताव महादिशा पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन.

अनुसूचित जाती आणि नवबौद्ध बांधवांच्या स्वयंरोजगार, आर्थिक सक्षमीकरण आणि सामाजिक उन्नतीसाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय योजना (पीएम-एजेएवाय) अंतर्गत ही अर्ज प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

रोजगाराच्या संधी निर्माण करून जीवनमान उंचावणे हा या योजनांचा मुख्य उद्देश असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे. अर्जाची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात होणार असून इच्छुक लाभार्थ्यांनी आपले अर्ज https://mpbcdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर करावेत. 

अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक आहे. प्रत्यक्ष कार्यालयात कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

या महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी 

अर्जदार अनुसूचित जाती व नवबौद्ध संवर्गातील असावा व त्याचे वय १८ ते ५० वर्षे असावे. वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण व शहरी तीन लाख रुपये आहे. अर्जदार हा या महामंडळाच्या योजनांचा व इतर वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.

अर्ज करण्यास आवश्यक कागदपत्रे

जातीचा व उत्पन्नाचा सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेल्या दाखला. पाच पासपोर्ट आकाराचे फोटो, रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, आधारकार्ड, पॅन कार्ड ची प्रत.

कोटेशन व व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या जागेचा पुरावा, व्यवसायानुसार इतर दाखले, आवश्यकतेप्रमाणे प्रकल्प अहवाल, बँक खाते क्रमांक, पासबुकची झेरॉक्स प्रत आवश्यक आहे.

अनुदान योजना, बीज भांडवल योजना, थेट कर्ज योजना, राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ योजना, राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळाच्या योजना, एनएसएफडीसी व एनएसकेएफडीसी शैक्षणिक कर्ज योजना या सर्व योजनांची सविस्तर माहिती, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रांची यादी व पात्रतेच्या अटी महामंडळाच्या महादिशा पोर्टलवर उपलब्ध आहेत.

तरी सर्व इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज करण्यापूर्वी माहिती वाचून घेणे आवश्यक आहे. जास्तीत इच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करावेत असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

 लाभार्थ्यांनी आपले अर्ज https://mpbcdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर करावेत.

या संकेतस्थळावर करावा


अतिवृष्टी अनुदान वितरणाला गती, लाभार्थी यादी फार्मर आयडी मंजुरी || Ativrushti Anudan 2025

राज्यात जून ते ऑक्टोबर कालावधीत झालेल्या अतिवृष्टी मुळे बाधित शेतकऱ्यांना मिळणार दिलासा, महत्वाची बैठक

Ativrushti Anudan 2025

📡 मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय आढावा बैठक 🗓️ दि. 19 नोव्हेंबर 2025

मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली सर्व मा. विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांची दुरचित्रवाणी द्वारे महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली.

📌 बैठकीतील मुख्य विषय : अतिवृष्टी – मदत वाटप, PM Gati Shakti, महासंपत्ती– MHUID

📝 मा. मुख्य सचिव यांनी दिलेले प्रमुख निर्देश :

1️⃣ अतिवृष्टी मदत वाटपासाठी Helpline Activate करणे
— जनतेच्या तक्रारी तत्काळ नोंदवून त्वरित निराकरण करण्याचे निर्देश.

— उर्वरित लाभवाटपाचे काम तातडीने पूर्ण करणे.

2️⃣ Agristack मधील Mismatch Data Correction
— खातेदारांच्या नावातील विसंगती त्वरित दुरुस्त करून प्रणालीतील डेटा 100% अचूक करण्याचे आदेश.

3️⃣ अतिवृष्टी मदत लाभार्थी यादी प्रकाशित करणे
— लाभार्थ्यांची अधिकृत यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर Upload करण्याचे निर्देश.

4️⃣ PM Gati Shakti Portal वर जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्प अपलोड करणे
— जिल्ह्यातील सर्व महत्त्वाचे व प्राधान्य प्रकल्प पोर्टलवर समाविष्ट करावेत, असे स्पष्ट निर्देश.



सोयाबीनची हेक्टरी उत्पादकता जाहीर || Soybean msp procurement #msp

सोयाबीनची हेक्टरी उत्पादकता जाहीर 

Soybean msp procurement


केंद्र शासनाच्या माध्यमातून जाहीर केलेल्या हमीभाव नुसार  राज्यात सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू झाली आहेत. 
या खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांकडून सोयाबीनच्या प्रति हेक्टर खरेदी संदर्भात कृषी विभागाने खरीप हंगाम 2025 साठी सोयाबीन उत्पादकतेचा पहिला अंदाज जाहीर केला आहे.



या उत्पादकतेनुसार शासकीय खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांना सोयाबीन देता येईल.

soyabin msp


शेतकऱ्यांना केंद्र शासनाचा एक मोठा दिलासा, पीकविमा योजनेत होणार बदल Pikvima

शेतकऱ्यांना कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचा आणखी एक मोठा दिलासा, पीकविमा योजनेत होणार बदल.

Pikvima 

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे होणारे पीक नुकसान आणि भातपिके पाण्याखाली जाण्याच्या घटनांचा प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत समावेश करायला मान्यता दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.



आता यासाठीच्या सुधारित कार्यप्रणालीनुसार, वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे होणारे पीक नुकसान आता स्थानिक धोका या श्रेणीमध्ये पाचव्या अतिरिक्त वीमा कवचाअंतर्गत जमेस धरले जाणार आहे. पीक नुकसानीसाठी जबाबदार असलेल्या वन्य प्राण्यांची नावे राज्य सरकारांकडून अधिसूचित केली जाईल. 

तसेच या पूर्वीच्या आकडेवारीच्या आधारे अशा प्रकारच्या नुकसानीचा सर्वाधिक धोका असलेले जिल्हे अथवा विमा केंद्रही राज्याद्वारे अधिसूचित केली जाणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना, पीक विमा ॲपच्या माध्यमातून, जिओ टॅग्ड अर्थात भौगौलिक स्थान चिन्हांकित केलेले छायाचित्रे अपलोड करून 72 तासांच्या आत नुकसानीची माहिती देणे गरजेचे असणार आहे.

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या या निर्णयामुळे या संदर्भातील अनेक राज्यांच्या दीर्घकाळापासूनच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. यासोबतच अचानकपणे, स्थानिक पातळीवरील धोक्यांपासून तसेच गंभीर स्वरुपाच्या पीक नुकसानीपासून शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या संरक्षणाला अधिक बळकटी देणे हा या निर्णयाचा उद्देश आहे. 

याअंतर्गतची विमा दावा प्रक्रिया ही प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या कार्यान्वयन विषयक मार्गदर्शक तत्त्वांनुसार तयार करण्यात आली आहे. याद्वारे देशभरात एक वैज्ञानिक, पारदर्शक आणि प्रत्यक्षात अंमलात आणता येईल असा व्यवहार्य आराखडा उपलब्ध असेल याची सुनिश्चिती केली गेली आहे. आगामी 2026 च्या खरीप हंगामापासून ही तरतूद लागू केली जाणार आहे.

अनेक वर्षांपासून, संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांना हत्ती, रानडुक्कर, नीलगाय, हरीण आणि माकडे यांसारख्या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे वाढत्या पीक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. जंगल, वन्यजीव संरक्षित क्षेत्र आणि डोंगराळ भागाजवळील प्रदेशांमध्ये अशा नुकसानीच्या घटना, वारंवार घडत असतात. मात्र आतापर्यंत, पीक विमा अंतर्गत अशा स्वरुपातील नुकसानीचा समावेश करण्याची तरतूद नव्हती. 

त्यामुळे बहुतांश वेळा अशा नुकसानीची भरपाई मिळत नसे. त्याचवेळी, पूरप्रवण आणि किनारपट्टीलगतच्या राज्यांमधील भात उत्पादक शेतकऱ्यांना देखील अतिवृष्टी तसेच क्षमतेपेक्षा जास्त पाणीसाठा होऊन वाहणाऱ्या जलस्त्रोतांमुळे वारंवार भातपिके पाण्याखाली जाणे आणि त्यामुळे नुकसान होण्यासारख्या समस्यांचा फटका बसला आहे. 

मात्र अशा प्रकारचे नुकसान हे नैतिक धोका (जाणिवपूर्वक नुकसान होऊ देणे) या स्वरुपाचे मानले जात असल्याने, तसेच पाण्याखाली गेलेल्या पिकांचे मूल्यांकन करण्यात प्रचंड अडचण येत असल्याने 2018 ला भातपिके वाहून जाण्याचा प्रकार स्थानिक पातळीवरील आपत्तींच्या श्रेणीतून वगळला गेला होता. यामुळे पावसाच्या हंगामात संवेदनशील पूर प्रवण जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या बाबतीत विमा संरक्षणासंदर्भात मोठी पोकळी निर्माण झाली होती.

या धोक्यांची आणि त्यामुळे शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेल्या आव्हानांची दखल घेऊन, कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने एक तज्ज्ञ समिती गठीत केली. या समितीने केलेल्या शिफारशींना केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मान्यता दिली आहे. 

या महत्त्वाच्या निर्णयामुळे, स्थानिक स्वरुपातील पीक नुकसानाच्या समस्येने ग्रस्त शेतकऱ्यांचे दावे, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत, वेळेवर आणि तंत्रज्ञानाधारित पद्धतीने निकाली काढणे शक्य होणार आहे.

या विमा सुरक्षा कवचाचा सर्वाधिक लाभ हा, मानव आणि वन्यजीव संघर्षाचे प्रमाण जास्त असलेल्या राज्यांतील शेतकऱ्यांना होणार आहे. 

विशेषतः ओडिशा, छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, उत्तराखंड तसेच आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, सिक्कीम आणि हिमाचल प्रदेश यांसारख्या हिमालयीन प्रदेशातील तसेच ईशान्य भारतातील राज्यांमध्ये वन्य श्वापदांमुळे पिकांचे नुकसान होण्याच्या घटना वापरंवार होत असल्याने तिथल्या शेतकऱ्यांना याचा सर्वाधिक लाभ मिळू शकणार आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत भातपिके पाण्याखाली जाण्याच्या नुकसानीसाठी स्थानिक स्वरुपातील आपत्तीपासूनचे विमा कवच पुन्हा लागू केल्याने विशेषतः किनारपट्टीलगतच्या भागातील आणि पूरप्रवण राज्यांतील शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळणार आहे. 

विशेषतः ओडिशा, आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र आणि उत्तराखंड या राज्यात भातपिके पाण्याखाली जाणे ही नियमित समस्या झाली आहे. अशा राज्यांतील शेतकऱ्यांना याचा सर्वाधिक लाभ मिळू शकणार आहे. या जोडीला वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे होणाऱ्या नुकसानाचाही समावेश करण्यात आल्यामुळे प्रधानमंत्री पीक विमा योजना अधिक समावेशक, प्रतिसादात्मक आणि शेतकरीस्नेही बनली आहे. यामुळे भारतातील पीक विमा व्यवस्था अधिक लवचिक आणि बळकट होऊ शकणार आहे.