राज्यात या भागात पुन्हा अवकाळीच संकट || Weather Update Maharashtra

राज्यात या भागात पुन्हा अवकाळीच संकट 

Weather Update Maharashtra 2026

राज्यात ऐन रब्बीच्या पिक कापणीचा हंगाम सुरू असतानाच शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा गारपीठीच संकट आलेलं आहे.

शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांसह स्वतः चे या गारपीट अवकाळी पावसापासून संरक्षण करावे अस आवाहन कृषी विभागाने केले आहे.

राज्यात 30 मार्च ते 31 मार्च दरम्यान पश्चिम विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात दुपारनंतर आभाळी वातावरण तयार होऊन मेघ गर्जनेसह, गारपीट पावसाची शक्यता आहे. विशेषत प्रामुख्याने कर्नाटक व तेलंगणा सीमेलगत असलेल्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील सीमावर्ती भागांमध्ये याचा मोठा फटका बसू शकतो.

या दरम्यान विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस गारपीट होण्याची शक्यता आहे.

राज्यात ३० मार्च दरम्यान काही भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर आभाळी हवामान तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्याच्या अंदाजानुसार ही स्थिती प्रामुख्याने खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील भागांमध्ये दिसून येऊ शकते. उर्वरित विदर्भात देखील हवामानात बदल दिसू शकतो. या दरम्यान विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता नाकारता येत नाही. ३१ मार्च रोजीदेखील राज्याच्या काही भागांमध्ये या हवामानाचा परिणाम दिसू शकतो.

हवामान विभागाने दिलेल्या पुढील पाच दिवसाचा अलर्ट नुसार ३१ मार्च २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्याना काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि सोसाट्याचा वाऱ्याचा (ताशी 30-40 किमी वेग) धोका वर्तविण्यात आला असून या भागाला Yellow Alert देण्यात आला आहे.

तर बीड,लातूर आणि धाराशिव या जिल्ह्याना विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, सोसाट्याचा वारा (ताशी ५०-६० किमी), तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता वर्तविण्यात आली असून या भागासाठी Orange Alert देण्यात आलेला आहे.

या अनुषंगाने शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, नदी काठावरील गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या असून यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे आवाहन ही करण्यात आले आहे.

प्रशासनाला ही अलर्ट मोड वर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत

शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या अद्ययावत अंदाजांकडे लक्ष ठेवावे व त्यानुसार शेतीची कामे नियोजित करावीत. 

सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.